सायंकाळ म्हणजे दिवसाला रात्रीशी भेटण्याची वेळ, म्हटले तर रात्र वाटते म्हटले तर दिवसही वाटतो. पण खरे तर दोन्हीही नसतात. असतात फक्त आभास, असण्याचे. बर्याेच वेळा आयुष्यात देखील असेच काही क्षण येतात, जेंव्हा की, नक्की कळतच नाही की ती वेळ कुठली आहे. त्यात छाया असते आनंदाची, पण विनाकारण आपण त्यात दू:खाची छाया आहे असे समजून वागतो […]
Category: Marathi
युवक महोत्सव – प्रहसनाच्या नावाने लावणीद्वारा धार्मिक भावनांवर आघात
कांही दिवसांपूर्वी डा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवात विद्यार्थ्यानी कांही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. त्यांत एका समूहाने कुठल्याशा सादरीकरणात सीतेच्या तोंडी लावणी टाकून नाट्यप्रतिभेचा, हिंदुसंस्कृतीचा व हिंदू धर्माचा घोर अपमान केला. खरे तर भारतीय दंडविधानाप्रमाणे दाखलपात्र गुन्हा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन हस्तक्षेप केला व ते प्रस्तुतीकरण बंद पाडले. ते चांगलेच […]
निवडणूकचिन्ह – मानचित्र – संकेतचित्र
[Symbol – Emblem – Picture]
सध्या भारताच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठासमोर निवडणूक चिन्ह किंवा पक्षचिन्ह ह्या विषयावर दोन राजकीय पक्षांमधील वादाचा मुद्दा आज सकाळपासून दिवसभर चर्चिला जात आहेत. त्यातील कायद्याच्या बाबींची चर्चा मी इथे करीत नाही तर, त्यानुषंगाने त्यात गुंतलेल्या नैतिक (Ethical), भावनिक (Emotional) व सामजिक (Social) मुद्यांचा ऊहापोह करणे हा उद्देश आहे. या विषयांत राजकीय पक्ष व त्याची […]
नैसर्गिक न्यायतत्वे (Principles of Natural Justice)
श्री एकनाथ शिंदे व श्री गोगवले यांनी सर्वोच्च न्यायालयात विधानसभेचे उपसभापती यांनी सोळा आमदारांना त्यांचे सभासदत्व का रद्द करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना (Notice) देण्यात आल्या व अठ्ठेचाळीस तासाच्या आत उत्तर देण्यास सांगितले. परंतु त्याधीच काही आमदारांनी उपसभापतीच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला. अशा परिस्थितीत, वास्तविकपणे, घटनेतील कलम प्रमाणे उपसभापतींनी सभासदत्व रद्द करण्याच्या सूचना […]
दक्षिणाम किम् ? दक्षिणाम किमर्थं ददाति?
दक्षिणाम किम् ? दक्षिणाम किमर्थं ददाति? (दक्षिणा म्हणजे काय? दक्षिणा का द्यायची?) आज मी एका वेगळ्या विषयावर लिहिण्याचे ठरविले आहे. म्हटले तर तो विषय दररोजचा आहे आणि म्हटले तर नाही. विषयाचे स्वरूप सामाजिक तर आहेच, पण एक दृष्टीने धार्मिक पण आहे. आपण आपल्या घरी कित्येक धार्मिक कार्यक्रम करत असतो. मग तो साधा सत्यनारायण असो की […]
सृष्टीच्या या दिव्य रुपे दिसतसे अव्यक्त ही………..
वाकलेल्या पल्लवीला पावसाने चुंबिले, अतृप्त काळ्या मातीला पावसाने सुखविले, दूर तिकडे पलीकडे गिरीकंदरा सुखवसा, हरित उत्फुल्ल वृक्षातूनी मुक्तबिन्दु स्वर जसा………. प्रसन्न शुभ्र जलप्रपाती तुषार मुक्त नर्तती, भेटण्यास जिवलगाशी प्रेमयुक्त विहरती, इवल्याच त्या पर्णांकुरी स्नेह सारा दाटला, आकंठ स्नेह हर्षासवे मैत्र सारा दाटला……… मनभावलेला वाकलेला वनमित्र हिरवा डोलतो, वायुसवे आपुल्याच अंगा प्रेमरूपे साहतो, शिर्षस्थ त्याच्या गुलाबी […]
तत्वज्ञान – भारतीय तत्वज्ञान व षडदर्शने
तत्वज्ञान ह्या शब्दाला आंग्लभाषेत ‘Philosophy’ असा शब्द आहे. संकृत मधील ‘दर्शनशास्त्र’ ह्या करिता Philosophy हा शब्द मुळीच योग्य नाही, कारण त्याचा अर्थ ज्ञानाविषयी प्रेम [Philo=Knowledge] व [Sophie=Love], म्हणजे ज्ञानाविषयी प्रेम. म्हणून दर्शनशास्त्राकरिता ‘Philosophy’ हा शब्द अयोग्य आहे. त्याकरिता फारतर जवळचा शब्द ‘Mysticism’ असा स्विकारता येऊ शकतो, याचे कारण खरोखरीच दर्शनशास्त्र गूढ, अगम्य व समजण्यास अतिशय […]
मनस्वी भटकणाऱ्या मेघाशी अभिन्नहृदय कालिदासाचा अपूर्व काव्यमय मनोहारी संवाद – मेघदूत
कालिदास हे एक अभिजात संस्कृत लेखक होते. त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत. कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो. संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना […]
आदि शंकराचार्य – एक अद्भुत व अकल्पनीय तत्वज्ञ
आज आदि शंकराचाऱ्यांची १२३३वी जयंती. महान व्यक्तींची जयंती व पुण्यतिथि साजरी करण्यापाठीमागे काय उद्देश आहे हे समजावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. याबाबत महाभारतात, एक प्रसंग आहे. महाभारतात एक कथा आहे. ‘धर्माने’ युधिश्ठिराला प्रश्न विचारला कि, ‘कोणत्या मार्गाने जावे? (‘क: पंथा:?) त्यावेळी युधिश्ठिराने उत्तर दिले ते असे, तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम्। धर्मस्य तत्त्वं […]
लोकसंवादाचा महामंत्र – पुराण कथनं
(१) पुराणांची पार्श्वभूमी व स्वरूप: वर्तमान हिंदू धर्माचे स्वरूप प्रामुख्याने पुराणाधिष्टित असून, हिंदू धर्माला अंगभूत असलेल्या असंख्य तात्विक व व्यावहारिक संकल्पना पुराणांनी विशद केल्या आहेत. त्यांनी वैदिक धर्मातील यज्ञादींचे महत्व कमी करून हिंदू धर्माला एक नवे वळण देण्याचे काम केले. वैदिक मंत्रांच्या बरोबरीने पौराणिक मंत्र वापरले जाऊ लागले. देवपूजा, राज्याभिषेक, मूर्तीस्थापना इत्यादि बाबतीत पौराणिक पद्धत […]
ईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास
ईशवास्य उपनिषद हे अत्यंत गहन, अर्थपूर्ण व अथांग असे उपनिषद आहे. केवळ १८ श्लोक इतके लहान, पण अर्थाच्या दृष्टीकोणातून तितकेच मोठे आणि आ विश्वे व्यापून उरलेले उपनिषद. यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेमध्ये ईशवास्य उपनिषद आढळते. वाजसनेय संहितेमध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत, त्यातील शेवटच्या अध्यायात हे उपनिषद आहे. या उपनिशदाचा मूळ व प्रमुख उद्देश हा परमेश्वराची विश्वातील एकात्मता […]
राष्ट्रीय विज्ञान दिन
आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ डॉ चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती, त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर डॉ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकशास्त्रातील विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला […]
|| श्रीमद्भगवद्गीता : ज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार ||
नारायणं नमस्क्रुत्य नरं चैव नरोत्तमम् | देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत ||” (महाभारत आदिम श्लोक) गिताजयंती म्हणजे ज्यादिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धात मार्गदर्शन केले. तो दिवस म्हणजे भारतीय कालगणनेनुसार मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. ही घटना कुरुक्षेत्रावर घडली, जे आत्ताच्या हरियाणामध्ये आहे. “महाभारतात गीतेचा समावेश झाला तेव्हांइतकीच आजही ती नावीन्यपूर्ण व स्फूर्तिदायक प्रत्यक्ष अनुभवाने ठरते. गीतेच्या […]
धर्मशास्त्र, वेद, श्रुति, स्मृति व पुराणे
प्राचीन भारतातील कायदे व न्यायपद्धतीचे मूळस्त्रोत || यतो धर्म स्ततो जया: || महाभारत हे धर्मयूद्ध होते. त्या युद्धाला काही नितीनियम होते, जसे आजच्या आधुनिक जगात युद्धामध्येही रेडक्रॉसमध्ये काम करित असलेल्या वाहनावर व कर्मं चार्यावर कोणत्याही पक्षाने हल्ला करायचा नसतो; तसेच महाभारत युद्धात सकाळी सूर्योदयापूर्वी युद्ध सुरू करावयाचे नाही व सूर्यास्तानंतर सुरू ठेवायाचे नाही असा दंडक […]
सामवेद आणि संस्कृत
वेदनाम सामवेदोस्मि देवानामस्मि वासव: | इंद्रियणाम मनष्चस्मि भूतानामस्मि चेतना ||२२|| भगवतगीता: अध्याय १० भगवत गीते मध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विभूति योगात स्पष्टपणे संगितले आहे की, वेदांमध्ये मी सामवेदात आहे. यावरून हे लक्षात येते की सर्व वेदांमध्ये सामवेद किती महत्वाचा आहे. या लेखात पुढे जाण्यापूर्वी आपण प्रथम सामवेदाविषयी काही महत्वाच्या ठळक गोष्टी पाहू. ०१] सामवेद हा भारत-यूरोपा […]
संस्कृत आणि गणित – एक परामर्श
संस्कृत आणि गणित अर्थात सांस्कृतिक गणितशास्त्र [Ethnomathematics] यथा सिखा मयूरानाम, नागानाम मन्यो यथा | तद्वत वेदांगा सहत्रानाम, गणितं मुर्धनाम स्थितम || ज्याप्रमाणे, मोराच्या डोक्यावर तूरा असतो, नागाच्या मस्तकावर मणी असतो, त्याचप्रमाणे, सर्व वेदांग शास्त्रामध्ये गणित खूप महत्वाचे आहे. आजच्या लेखात आपण संस्कृत मध्ये गणित या विषयाचे काय काय साहित्य उपलब्ध आहे हे पाहणार आहोत. जगभरात […]
संस्कृत साहित्य
संस्कृत भाषा ही भारताने जगाला दिलेली एक अभूतपूर्व देणगी आहे. संस्कृत ही अत्यंत अचूक, संपूर्ण, वैज्ञानिक, मधुर व श्रीमंत भाषा आहे. जगातील कुठल्याही भाषेपेक्ष जास्त अक्षरे व शब्द संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत साहित्यात काव्य, नाटक, तत्वज्ञान, तांत्रिक, वैज्ञानिक व धार्मिक ग्रंथांचा सामावेश होतो. आदि काळापासून संस्कृतचे ज्ञान मौखिक पद्धतिने पिढ्यान पिढ्या प्रसृत करण्यात आलेले आहे. […]
सामाजिक माध्यमे – महत्व व उपयोग
एकविसाव्या शतकात लोकशाही मधील एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे सामाजिक माध्यमे. मागच्या शतकाच्या शेवटी शेवटी विदयूत माध्यमांचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. साधारणत: १९९९ च्या मागे पुढे, प्रथम भारतात विद्युतकसंदेश प्रणाली सुरू झाली. माहिती जतन करून ठेवण्यासाठी फ्लॉपी, नंतर सीडी, डीव्हीडी अशी हळू हळू वाटचाल सुरू झाली. बाइट (१ अक्षर किवा १ मुळाक्षर) ह्या परीमाणा पासून […]
शब्दांच्या पलीकडे
“हेल्लो….आपण कोण बोलताय?” पलीकडून रागावलेला प्रश्न ऐकून मी काय उत्तर द्यावे ह्या विचारात होतो. इतक्यात पुन्हा तोच प्रश्न अधिक जोरात, “अहो उत्तर का देत नाही तुम्ही?” “मला बोलू तर द्या.” मी कसेबसे बोललो. “फोन करणार्याने आपले नाव सांगायचे असते मला वाटते.” मी सरळ सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारला. “नावात काय आहे?” त्यांचा अजून रागावलेला प्रश्न फास्टबॉल […]
आवाहन
आवाहन नमस्कार २००५ सालच्या मुंबई फेस्टिव्हल साठी ६३ मुलांना घेऊन मी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो ” ही प्रार्थना सादर केली. याच प्रार्थनेने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. ही आनंदाची गोष्ट आहे. दुःखाची बाब अशी की पुढच्या ३ तासांच्या सोहळ्यामध्ये नाना पाटेकर यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण सोडले, तर मराठीचे एकही अक्षर उच्चारले […]